21.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले तर आयुष्यात यशस्वी व्हाल -भाजपा नेते राजेश गिते

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले तर आयुष्यात यशस्वी व्हाल -भाजपा नेते राजेश गिते

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –

मौजे बेलंबा तालुका परळी वैजनाथ येथे महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सुरुवातीला तथागत गोतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.बेलंबा गावच्या प्रथम नागरिक महानदा ताई सरवदे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले आणि सर्व मान्यवरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना वैधनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथ गड पांगरी संचालक तथा भाजपा नेते राजेश गिते यांनी म्हटले की प्रत्येक व्यक्तीने जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले तर आयुष्यात यशस्वी होण्या पासून कोणी ही रोखु शकणार नाही.आपण आपल्या मुलांना लहानपणापासून बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य, ज्ञान, संघर्ष आणि कार्य याची माहिती कशी होईल या साठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीने पुढील वर्षी विद्यार्थी यांच्या विविध स्पर्धा ठेवण्याचे आवाहन केले.तसेच आपल्या गावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने यशस्वी झाले पाहिजे अशी ईच्छा राजेश गिते यांनी व्यक्त केली.
भीम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी बेलंबा ग्राम पंचायत सरपंच महानंदा ताई सरवदे, बेलंबा ग्राम पंचायत उप सरपंच संजय गिते, बेलंबा ग्राम पंचायत सदस्य किशोर गिते, मनोहर भाऊ मुंडे, श्रीकृष्ण होळंबे, युवा नेता बाबासाहेब सरवदे, बंडु रोडे,राम सरवदे , हरिश्चंद्र सरवदे, जेष्ठ नेते संभाजी सावंत,राजेभाऊ कांबळे आदि आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेलंबा भीम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या