1 C
New York
Sunday, January 18, 2026

Buy now

भरवसा नसलेल्या राजकारणारवर काय बोलायचं ? अबू आझमी

भरवसा नसलेल्या राजकारणारवर काय बोलायचं ? अबू आझमी
  • मुंबई वृतसंस्था:
ज्या गोष्टींवर विश्वास बसत नव्हत्या, त्या झाल्या. काहीही भरवसा नाही त्यामुळे या राजकारणावर काय बोलायचं? असं अबू आझमी म्हणाले. त्याचप्रमाणे स्थगन प्रस्तावावर चर्चा झाली पाहिजे अशीही मागणी अबू आझमी यांनी केली. सध्याच्या घडीला चित्र असं आहे की विरोधी पक्ष नेता जो जोरकसपणे विरोधकांची बाजू मांडतो तोच गेला तर मग काय करणार? विरोधी पक्षनेताच सत्तेत जाऊन बसल्यावर आता काही सांगता येणार नाही. आज विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला आहे. त्यावर चर्चा झाली पाहिजे असंही अबू आझमींनी म्हटलं आहे. आमची कुणाशीही चर्चा सुरु नाही असंही आझमी यांनी म्हटलं आहे.
  • नितेश राणेंवर टीका
या अधिवेशनात आम्ही लव्ह जिहादच्या विरोधात कायदा आणणार असं नितेश राणे म्हणाले. त्यावर विचारलं असता अबू आझमी म्हणाले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी, युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर कायदा आणू असं नितेश राणे म्हणाले असते तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत केलं असतं.
https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या